आयुष्याची परिपूर्णता

आज म्हटले, आयुष्य विणायला घेऊ या, जमतंय का ते बघू या.
वाटले अगदी सोपं असेल, रंग संगती जमून आली कि आयुष्य ही सुंदर दिसेल.

प्रश्न पडला धागे कोण कोणते घ्यायचे? एक दोनच कि सगळेच वापरायचे?
मग ठरविले फक्त छान छानच धागे घेऊ, एक दोनच काय? सगळेच एकमेकात विणू.

सुरुवात केली वात्सल्याच्या धाग्याने, धागा होता फार उबदार आणि मुलायम.
म्हटले छान आहे हा धागा, धाग्याने वीण ही राहील कायम.

मग घेतला मैत्रीचा धागा, म्हणता म्हणता बर्याच भरल्या जागा.
थोडे थोडे आयुष्य आकार घेऊ लागले, पण अजूनही बरेचसे विणायचे बाकी राहिले.

एक एक धागा आशेचा, सुखाचा आणि आनंदाचा घेतला, प्रत्येक धाग्यात तो आपसूकच गुंतत गेला.
हळू हळू वीण घट्ट होत होती, तरी देखील कसली तरी कमी मात्र होती.

मग घेतला एक नाजुक धागा प्रेमाचा, धागा होता सुंदर आणि रेशमी
धाग्यांनी त्या आयुष्याला अर्थ आला लागुनी.

एक एक घेतला धागा यशाचा, कीर्तीचा आणि अस्तित्वाचा,
त्यामुळे एक नवा उद्देश्य मिळाला.

सगळेच धागे छान सुंदर आणि प्रसन्न होते
तरी देखील त्यांच्यातल्या एक सारखेपणामुळे मन मात्र खिन्न होते.

थोडे धागे पडले होते निवांत बसून असेच,
म्हटले बघू या तरी यांच्यामुळे आयुष्य होतंय का सुरेख.

मग घेतला एक धागा दुःखाचा, एक निराशेचा,एक धागा अपयशाचा आणि एक धागा पराजयाचा.
हे चार धागे विणता एकमेकांमध्ये, आयुष्यालात्यांच्यामुळे खरा अर्थ लाभला.

अपयशाशिवाय यश नाही, दुःखाशिवाय सुख नाही
पराजायाशिवाय जय नाही आणि निराशेशिवाय अशा नाही.

महत्व पटले आहे सर्व धाग्यांचे आज मला,
सुंदर सुंदर धाग्यांनीच फक्त आयुष्याला मजा नसते.

सध्या सुध्या लोकरीच्या विणकामात ही रंगसंगती लागतेच.
मग आयुष्य विन्तांनाच का आपल्याला भीती वाटते?

सर्व धागे एकमेकांत विणूनच एक परिपूर्ण आयुष्य बनते.
कुठ्लाध्गा कुठे,कसा वापरायचा हे मात्र ज्याचे त्याच्यावरच असते.