शब्द घाव घालतात. स्वर लळा लावतात. सूर सहजपणे कानातून प्रवेश करून थेट रसिकांच्या हृदयावर साम्राज्य प्रस्थापित करतात.

शब्द लक्षात राहतात किंवा विसरलेही जातात. सूर मात्र चित्तात भिनून जातात. 
शब्द एखाद्याचे कान पकडतात तर स्वर गळामिठी मारतात. 

शब्दांना अर्थाची अट असते. सुरांचे मात्र तसे नाही. स्वरांचे भावाशी सख्य असते. 
शब्दाचे सार्थक होण्यासाठी बुद्धीची गरज लागते, तर स्वरांची मोहिनी सर्व सृष्टीवर पडते. 
शब्द हे व्यवहाराचे साधन बनले आहे, तर स्वर फक्त कलाविलासातच आपले सार्थक मानतात. 
कधी कधी शब्दांनी ऐकणाऱ्यांना आनंद मिळतो. संगीताने मात्र आत्मानंदाची ग्वाही मिळते. 
– राम शेवाळकर